मन | अहंकार | कर्म | ब्रम्हर्षिज हर्मिटेज

मन


Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

मन हे जैविक उत्क्रांतीत सर्वोच्च असे सहावे इंद्रिय आहे. हे आपल्याला मानवी अनुभवांपैकी सर्वोच्च अनुभव घेण्यास मदत करते.

मायेच्या सहाय्याने निर्मितीचा अनुभव घेणे हे मनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

मन हे ५ ज्ञानेंद्रियांशी संवाद साधते - कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक अनुक्रमे आवाज, स्पर्श, दृष्टी, चव आणि गंध अनुभवण्यास मदत करते.

मन आणि शरीर एकत्र मिळून काम करतात व या इंद्रियांसाठी मेंदूचा केंद्रबिंदू म्हणून वापर करतात.

मनात भावनांचा वास असतो. तसेच आठवणी व कर्मांचा साठा येथे केला जातो.

मन हे संपूर्ण मानवी प्रणालीत पसरलेले आहे. तसेच संकल्प करून संपूर्ण ब्रम्हांडात पसरण्याची आणि व्यापण्याची क्षमता देखील मनात असते.

मनाची कार्यप्रणाली सर्वात सूक्ष्म आणि गुंतागुंतीची मानली जाते.

मनाच्या इतर कार्यांमध्ये अनुभव घेणे, कल्पना करणे, निर्मिती करणे, समजणे, लक्षात ठेवणे व पुनर्प्राप्ती करणे इत्यादी आहे.

जास्त कर्मांच्या ठशांमुळे मन क्षीण होते आणि आत्म्याची पुढील प्रगती थांबते.

जीवाची शुद्धता मुख्यत्वे मनाच्या शुद्धतेवर अवलंबून असते, म्हणून मनाला मानसिक अशुध्दी किंवा षडरिपूंपासून मुक्त ठेवणे अत्यंत आवश्यक असते.

अशा अशुद्धतेपासून मन शुद्ध करण्यामध्ये साधनेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.


अहंकार


Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

अहंकार ही आत्म्याचीच चुकीची आर्वृत्ती आहे.

अहंकारामुळे आपण स्वतःला शरीर अगर मन असे ओळखतो.

आत्म्याने जेव्हा शरीरात प्रवेश केला तेव्हा अहंकाराचा जन्म झाला व अहंकारामुळे आपण स्वतःला शरीरच समजु लागलो व आपली खरी ओळख विसरलो.

मन व मायेमुळे अहंकार निर्माण होतो.

अहंकार आत्म्याच्या प्रज्ञेस झाकोळून टाकतो.

अहंकारामुळे आपल्यावर मर्यादा येतात व अहंकार दिशाभूल करतो.

अहंकारामुळेच आपल्याला दुःख व यातना भोगाव्या लागतात.

अहंकार साधनेच्या मध्ये येतो आणि आत्मसाक्षात्काराची प्रक्रिया त्यामुळे लांबते.

अहंकार हा फक्त प्रेमामुळे नाहीसा होतो.


कर्म


Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

कर्म म्हणजे कृतीचा परिणाम.

केलेल्या कृतीच्या हेतुवर आधारित त्याच्या चांगल्या किंवा वाईट परिणामांचा ठसा उमटतो आणि त्यालाच चांगले किंवा वाईट कर्म म्हणतात.

चांगले कर्म आनंद आणतात तर वाईट कर्म दुःख आणतात.

हे ठसे सारख्याच म्हणजे चांगल्या किंवा वाईट ठशांना आकर्षित आणि प्रभावित करतात. मग ती प्रवृत्ती बनते आणि शेवटी सवय आणि हेच नशीब निर्माण करतात.

हेच ठसे मनावर आणि शरीरावर नोंदवले जातात.

जेव्हा आपण एखादी कृती अहंकाराने करतो तेव्हा मन षडरिपूंचे वाईट ठसे निर्माण करतो.

जेव्हा आपण आत्म किंवा आत्म्याची जागरूकता ठेवून शरणागती पत्करून स्वत्व सोडून एखादी कृती करतो तेव्हा आपल्याला कोणतेही कर्म लागू होत नाही, ह्या कृतीला कर्मयोग म्हणतात.

चांगले कर्म किंवा वाईट कर्म हे दोन्हीही मनाच्या आवरणावर भार टाकतात आणि पुढील चढत्या प्रवासात अडथळे आणतात.

कर्मामुळे आपण ह्या पृथ्वीतलावर एक आत्मा म्हणून अडकले आहोत आणि वरती जाऊ शकत नाही.

कर्मामुळे जीवन व मृत्यु ही साखळी चालू रहाते.

या जन्माचा मुख्य उद्देश म्हणजे कर्म साफ करून, जीवन चक्राची साखळी तोडून परत आपल्या निवासस्थानी म्हणजे प्रकाशाकडे जाणे हा आहे.